नाशिक ग्रामीण

दुष्काळी भागातील जनता शिधा घेऊन मुंबई कडे रवाना

दुष्काळी भागातील जनता शिधा घेऊन मुंबई कडे रवाना

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव

येवला /दिनांक :1सप्टेंबर :मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी येवला तालुक्यातील अनेक गावांमधून समाज बांधव मुंबईच्या दिशेने जात असून, आजही अनेक कार्यकर्ते मुंबईकडे शिधा घेऊन रवाना झाले.

सतत दुष्काळी असलेल्या येवला तालुक्यातील रेंडाले येथील मराठा मोर्चाचे माधव बाबुराव आहेर,गणेश साहेबराव आहेर,प्रवीण नथू आहेर,संपत देवचंद आहेर, पोपट सूर्यभान आहेर,रामेश्वर कारभारी आहेर,नवनाथ रामचंद्र आहेर आदींसह मोठ्या संख्येने मुंबईस्थित असलेल्या लाखो लोकांपैकी सुमारे दोन हजार आंदोलनकर्ते यांच्यासाठी चटणी भाकर, भेळ भत्ता घेऊन नगरसुल रेल्वे स्टेशन येथून आज रेल्वेने रवाना झाले.

@ विनोद पाटील

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!