सिन्नरच्या … या “आमदारा. ” मुळे वावी शिवारात फिरणार पाणीच – पाणी … !
ओसाड माळरानावर फुलणार हिरवीगार शेती
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर, दि : 23 एप्रिल 2026 — जवळपास 1972 पासून काळाच्या दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या तालुक्याला वरदान ठरणाऱ्या बंदिस्त पुरचारी मुळे नैसर्गिक शाप ठरलेल्या सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील गावांना सुजलम — सुफलम करणारा ठरत आहे .
वर्षानुवर्ष दुष्काळ हा पाचवी लाच पुजलेला असल्याने तालुक्यातील जनता अनेक वर्षापासून आर्थिक मागास राहिलेल्या शेतकऱ्यांना देवदूताच्या रूपाने शेतकरी पुत्र समाजाची गरिबांची जाण असलेला एक कर्तुत्वन आमदार ” पाण देव ” म्हणून लाभला आहे.
सर्व सामान्य माणसाला आधार देऊन डोळ्यातलं आश्रु पुसुन खडकाळ माळराणावर जमीन ओली करून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करण्याचा चंग बांधलेला आमदार माणिकराव कोकाटे यांनी मागील वर्षी तालुक्यातील शहा परिसरातील या योजनेचा प्रत्यक्ष प्रयोग अमलात आणला आणि तो यशस्वी झाल्याची भावना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरून व प्रतिक्रिये वरून लक्षात येत आहे.
अनेक वर्षापासून दुष्काळाची चटके सोसलेल्या शेतकऱ्यांना अनेक आमदारांचा कारभार पाहिला.. त्यात काहींनी तालुक्यातील छोट्या मोठ्या योजना आणून दैनंदिन विकास कामा भर दिला असला तरी तालुक्याला ठोस असा प्रयोग करणारा पहिला आमदार लाभला तो म्हणजे मुसळगाव एमआयडीसी स्थापन करणाऱ्या स्वर्गीय सूर्यभान नाना गडाख यांचा. गरीब कुटुंबांमध्ये पुढे आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील या आमदारांनी कुठलंही शिक्षण नसताना परदेशात जाऊन उद्योजकांशी करार केले व मुसळगाव एमआयडीसीच्या खडकाळ माळराणावर औद्योगिक वसाहत उभी करून तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला तसेच उद्योजक व व्यवसाय दळणवळण यांची साधनं तयार झाल्याने तालुक्यातील विकासात भर पाडली. अशा या आमदाराच्या ठोस व परिमान कारक कामामुळे श्री गडाख यांच्या कर्तुत्वाला तालुक्यातील जनते ने भरभरून साथ दिली त्यानंतर दुसरे आमदार लावले माननीय तुकाराम डीघोळे . श्री. डीघोळे सलग तिसऱ्यांदा आमदार होऊन राज्यमंत्री पदाचा मान मिळवलेल्या दिघोळे यांनी दूरदृष्टी लक्षात घेऊन सिन्नर जवळील माळेगाव चा खडकाळ .ओसाड माळरानावर शासकीय औद्योगिक व्यवसाय स्थापन करून तालुक्यातील रोजगारासह औद्योगिक विकासाला सिन्नर शहराला आर्थिक चालना मिळवून देण्यासाठी भर दिला. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करून तालुका गिरगाव हिरवा गार होण्याची स्वप्न पाहणाऱ्या अशा जनतेला योगदान लाभलेल्या अशा या दोन आमदारांनी तालुक्यातील जनतेला भरभरून दिलं आहे. कायमचा ठोस उपाय व विकास करणारे या दोन आमदारांना तोडीसतोड व प्रखर इच्छाशक्ती व धाडसी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने लाभले . श्री . कोकाटे यांनीही जनतेच्या मनात घर करून सलग पाच वेळा आमदारकी मिळवली अशी असतानाच आमदार कोकाटे यांनी जनतेचे आपण कुठेतरी ऋणी लागतो व समाजासाठी काय करू शकतो याचा अभ्यास करून तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्याचा चंग बांधला आणि वाया जाणार पाणी कुठलीही इलेक्ट्रिक वीज पंप न वापरता. विद्युत विज विज न वापरता फक्त नैसर्गिक उताराच्या आधारावर बंदिस्त पाईपलाईन करून पूर्व भागातील गावांना व नदी नाले व तळ्यांना पाण्याने भरून काढल्याने दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या व नेहमीच कोरडवाहू असलेल्या जमिनीवर या महत्त्वकांक्षी योजनेमुळे परीसरात पाणीच पाणी दिसू लागल्याने परिसर बहरुन लागला आहे.
मागील वर्षी शहा परिसरातील या पूर चारीच्या योजनेचा फायदा अनेक शेतकऱ्यांना दिसू लागल्याने यावर्षी उर्वरित वावी परिसरातील गावांनाही याचा फायदा व्हावा या दृष्टीने आमदार माणिकराव कोकाटे यांनी पुढाकार घेऊन चालू वर्षी शेतकऱ्यांना पाणी मिळून देण्यासाठी या योजनेचा अक्षय तृतीया मुहूर्तावर शुभारंभ केला असून ही योजना पावसाळ्यापर्यंत पूर्ण होऊन शेतकऱ्यांना याचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



