नाशिक ग्रामीण

शासन निर्णय म्हणजे –” वराती मागुन घोडं… ! 80 टक्के पेरणी पूर्ण –

शासनाच्या आदेश - उशिरा सुचलेले शहाणपण


वेगवान मराठी ( Nashik ) मारूती जगधाने

सिन्नर : दि , 22 जुन 2025 — भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारने उचललं दमदार पाऊल.

[21/06, 3:12 PM] Wegwan: पेरण्या पूर्ण? कृषी विभागाला उशीरा सुचलेले शहाण पण …!

” सरकारचं वराती मागुन घोडं —!!

वेळेवर पाऊस दाखल झाल्याने पेरणी वेळेवर झाल्यावर शासनाचा शहाणपणा उघड…

…..     सोयाबीन पिकाला सर्वाधिक पसंती —

 

 

कृषी बियाणे विक्रेत्यांनी बियाणे विक्री करताना मूळ किमती …

किंवा योग्य किमती व्यतिरिक्त अधिक पैसे घेतल्यास

त्यांनी कारवाईला सामोरे जावे अशी प्रेस नोट जिल्हा कृषी विभागाने काढलेले आहे कृषी विभागाने पत्र म्हणजे आता खरीप पेरण्या जवळपास 80 टक्के पूर्ण झाले नंतर कृषी विभागाला हे सुचलेले शहाणपण आहे की काय असा संताप जनक प्रश्न शेतकरी वर्गातून केला जात आहे?जिल्हा अध्यक्ष कृषी विभागाने20 जून 2025 रोजी काढलेल्या पत्रकामध्ये म्हटले की शेतकऱ्यांनी कृषी बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करताना त्या बियाण्यास नंतर बिलाची पक्की पावती घ्यावी तसेच बियाण्याच्या मूळ किमतीमध्ये असलेल्या किमत तपासून ते पैसे द्यावे व बिलाची पक्की पावती सांभाळून घ्यावे तसेच यासंदर्भात कमी जास्त बिल असल्यास त्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी तालुका पंचायत समिती, ता कृषी अधिकारी तसेच विभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी द्याव्यात असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे या प्रसिद्धी पत्रकावरती दिनांक 20 जुन रोजी पत्रक काढण्यात आलेले आहे दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी यावर्षी पाऊस मे महिन्यामध्ये सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी शेतीमाशक्ती करून जवळपास 80% पेरण्या हुन अधिक पेरण्या पूर्ण केलेले आहे सध्या ज्या शेतकऱ्यांना आउत फाटा वेळेत मिळालेल्या नाही अशा शेतकऱ्यांच्या पेरण्या म्हणजे जवळपास फक्त 20% प्रेरणा शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यानंतर कृषी विभागाने सुचलेले शहाणपण म्हणावे की काय उशिराने का होईना हे पत्र काढलेला आहे यात बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरण्या देखील केलेले आहे यावरून शासन आणि प्रशासन किती सतर्क आहे हे दिसून येते .

तालुका जिल्हा स्तरावरती कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप केले जाते यासंदर्भात देखील कुठे सुतवाचन झालेले नाही बियाणे कसे वाटप केले काय केले याच्याबद्दल कृषी विभागाने खुलासा करावा अशी मागणी देखील पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे.

[21/06, 3:16 PM] Wegwan: प्रतिक्रिया:

नांदगाव तालुक्यामध्ये 50टक्के पाऊस झाला असून पन्नास टक्क्याहून अधिक पेरण्या पूर्ण झालेल्या आहे उर्वरित पेरण्या होत आहे तसेच तालुक्यामध्ये 165 क्विंटल भुईमूग बियाणे व आठ क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी विभागामार्फत मोफत वाटप केले जात आहे .काही वाटप केले गेले आहे काही बियाणे वाटप होत आहे त्या संदर्भात कृषी विभागाने तालुक्यात रीतसरपणे माहिती देऊन बियाणे मोफत वाटण्यासंदर्भात शेतकऱ्यांशी संपर्क केला आहे अशी प्रतिक्रिया तालुका कृषी अधिकारी रवींद्र डंबाळे यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

शासन निर्णय म्हणजे –” वराती मागुन घोडं… ! 80 टक्के पेरणी पूर्ण – - वेगवान नाशिक