जगातील सर्वात मोठा 12 लेनचा महामार्ग महाराष्ट्रातून ..
जगातील सर्वात मोठा 12 लेनचा महामार्ग महाराष्ट्रातून .. The world's largest 12-lane highway through Maharashtra

वेगवान नाशिक / धिरेंद्र कुलकर्णी
मुंबई, ता. 12 सप्टेंबर 2024- भारतातील प्रमुख महामार्गांमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांना जोडणारा गोल्डन चतुर्भुज आणि श्रीनगर ते कन्याकुमारी आणि सिलचर ते पोरबंदर यांना जोडणारा उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम कॉरिडॉर यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग 44 (NH 44) हा श्रीनगर ते कन्याकुमारी पर्यंत जाणारा सर्वात लांब महामार्ग आहे. भारताचे महामार्ग नेटवर्क संपूर्ण देशात व्यापार, प्रवास आणि आर्थिक वाढ सुलभ करते. मात्र यामध्ये आता भर पडली आहे. ती India Longest Expressway या महामार्गाची, हा महामार्ग महाराष्ट्रातून जात असून हा जगातील सर्वात मोठा महामार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर अनेक सविधा देण्यात येणार आहे.
हवामान विभागाचे हे 15 सप्टेंबर 2024 चे अपडेट पहा
देशात रस्त्यावरील नेटवर्कचा विस्तार होत आहे. देश के कोने-कोने एक्सप्रेस, हाईवे जोडले जात आहे. कोवळे रस्त्यावर डोंगरामधून हा महामार्ग जंगालामधून मार्गक्रमण करत आहे. आपल्या भारत देशामध्ये एक हाईवे असे आहे जो हा देश नाही तर जगाचा सर्वात मोठा लांब एक्सप्रेस वे आहे. 1386 किलीमीटर लांबीचा हा एक्सप्रेस वे आर्थिक राजधानी मुंबई ते राजधानी दिल्ली पर्यंत जाणार आहे.
24 तासऐवजी फक्त 12 तासामध्ये तुमचा प्रवास होणार
हा महामार्ग देशातल्या अनेक राज्यांना एकमेकांशी जोडतो. हा महामार्ग तयार करण्यासाठी 80 लाख टन सीमेंट, 15,000 हेक्टेर जमीन आणि 1 लाख कोटी रुपयांचा निधी लागला आहे. हा रस्ता अनेक अर्थाने अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हा जगातील सर्वात लांब महामार्ग मानला जातो. सध्या आठ पदरी रस्त्याचे 12 लेनमध्ये रूपांतर होणार आहे. विशेष बाब म्हणजे मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस ही आशियातील पहिली एक्स्प्रेस वे आहे जिने वन्य प्राण्यांसाठी ग्रीन ओव्हर पासची व्यवस्था केली आहे.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसचा कमाल वेग १२० किमी प्रतितास आहे. किंवा स्थानिक महामार्गालगत औद्योगिक कॉरिडॉर विकसित होतो. दिल्ली मुंबई एक्सप्रेसची पायाभरणी 9 मार्च 2019 रोजी झाली. 50 हावडा पुलांच्या बरोबरीने असलेल्या या महामार्गाच्या निर्मितीमध्ये 12 लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला. एक्स्प्रेस वेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वाहनांच्या इंधनाच्या वापरात 32 कोटी लिटरची बचत होईल.
आठ लेनचे दोन बोगदे बनवण्यात आले आहेत. ज्यामुळे वन्य प्राणी सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. पहिला बोगदा राजस्थानच्या मुकुंद्रा सेंक्चुरीच्या खाली तर दुसरा बोगदा माथेरान इको सेंसिटिव्ह झोनमध्ये बनवला जाणार आहे. मुकंद्रा आणि रणथंबोरमधून जाणाऱ्या भागाला सायलेंट कॉरिडॉर करण्यात आलं आहे. हा द्रुतगती मार्ग 5 प्रमुख वन्यजीव अभयारण्यांमधून जात असल्याने वाहनांचे हॉर्न आणि सायरनवर बंदी असणार आहे. या एक्स्प्रेस वेवर हॉर्नऐवजी सतार आणि शहनाईचे सूर ऐकू येणार आहेत.
या एक्स्प्रेस वे वर पेट्रोल पंप, मॉटेल, रेस्ट एरिया, रेस्टोरेंट्स, दुकानं, एटीएम, पार्किंग, रिचार्ज स्टेशन्स, डॉरमेट्री, हॉस्पिटल्स, फूड कोर्ट, फ्यूल स्टेशन यासह 94 पद्धतीच्या सुविधा मिळणार आहेत. या संपूर्ण द्रुतगती मार्गावर 30 लेन टोलनाके उभारले जात आहेत. याठिकाणी वाहनांची प्रतीक्षा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी असेल. महामार्गाच्या दोन्ही बाजूला 13 लाखांहून अधिक झाडे लावली जाणार आहेत.
दिल्ली-मुंबई महामार्गावर 12 हेलिपॅड बांधण्याची तयारी सुरू आहे, ज्याचा उपयोग वैद्यकीय आपत्कालीन आणि लष्करी कामासाठी केला जाईल. NHAI नुसार, सर्व 12 हेलिपॅड राजस्थानमध्ये बांधले जातील.
