शेती

शेतकरी बंधुनो चला येवल्याला कर्जमुक्तीच्या हक्काच्या मागणीला!

शेतकरी बंधुनो चला येवल्याला कर्जमुक्तीच्या हक्काच्या मागणीला!

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव

येवला दिनांक 20 जुलै 2024

शेतकरी बंधुनो चला येवल्याला कर्जमुक्तीच्या हक्काच्या मागणीला!

सर्व मध्यम मुदत थकीत शेतकरी बांधवांना आवाहन

नाशिक जिल्हा बँक मध्यम मुदत कर्ज – शून्य टक्के व्याज योजना अंमलबजावणीसाठी लढा उभारूया!
मंत्री महोदय यांना साकडे घालूया “!!

📍 ठिकाण: मा. श्री. छगन भुजबळ साहेब यांचे संपर्क कार्यालय, येवला
🕘 *वेळ: सकाळी ९:०० वाजता*
📅 *दिनांक: २१ जुलै २०२५*

*शेतकरी संघटना समन्वय समिती – महाराष्ट्र राज्य*
राज्य समन्वयक: भगवान पुंडलिक बोराडे – 📱 9421729433

*संयोजक: भागवतराव बा. सोनवणे*
(शेतकरी कर्जमुक्ती अभियान – येवला तालुका, जि. नाशिक)
📱 8806272733 / 9689333399
📧 Farmers.Maharashtra@gmail.com

🟨 प्रति,

*मा. श्री. छगनराव भुजबळ साहेब*
*पालक (मंत्री) – नाशिक जिल्हा*
विधानसभा सदस्य – येवला
*मंत्री – अन्न व नागरी पुरवठा, महाराष्ट्र राज्य*

विषय:

*नाशिक जिल्हा बँक वाचविणे तसेच मध्यम मुदत कर्जावरील “शून्य टक्के व्याज” योजना आणि १० सुलभ हप्त्यांची अंमलबजावणी करावी, या मागणी संदर्भातील निवेदन.*

माननीय महोदय,

आपण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जदार म्हणून त्यांच्यावर अतोनात व्याजाचा बोजा पडलेला आहे.

*स्थिती पुढीलप्रमाणे आहे:*

एकूण थकीत शेतकरी: ५६,०४०

थकीत मुद्दल: ₹९०१.७९ कोटी

बँकेने यातील ₹६२०.११ कोटी व्याज माफ करण्याची तयारी दाखवलेली आहे

मात्र उर्वरित ₹६७९ कोटीचे व्याज शेतकऱ्यांकडून वसूल करण्याचा बँकेचा मानस आहे.

*शेतकऱ्यांची भूमिका व भावना:*

शेतकऱ्यांची ही व्याज भरण्याची कुवत नाही. *शेतजमिनी लिलावात जाऊन किंवा बँक बुडाली तरी शेतकऱ्यांना या अन्यायकारक व्याजाची परतफेड मान्य नाही.*
*या अन्यायाविरुद्ध ७७५ दिवसांपासून शांतीपूर्ण आंदोलन सुरू आहे.*

*मागण्या:*

1. मध्यम मुदत कर्जावर संपूर्ण व्याज माफी (०% व्याज योजना) जाहीर करावी

2. शिल्लक मुद्दल १० सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची योजना अमलात आणावी

3. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर सुरू असलेली लिलाव / नोटीस प्रक्रिया तत्काळ थांबवावी

*आपल्याकडून अपेक्षा:*

*आपण राज्याचे ज्येष्ठ, अनुभवी व लोकाभिमुख मंत्री आहात. त्यामुळे ५६ हजार शेतकरी कुटुंबांचा विश्वास आहे की, आपल्याच पुढाकाराने ही न्याय्य योजना शासन दरबारी मान्य होऊ शकते.*

*योजना अमलात आल्यास:*

✅ बँकेचे पुनरुज्जीवन होईल
✅ शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक दिलासा मिळेल
✅ जिल्ह्याची अर्थव्यवस्था सशक्त होईल

*विनम्र निवेदक:*

भगवान पुंडलिक बोराडे
राज्य समन्वयक – शेतकरी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र
📱 9421729433

भागवतराव बाळनाथ सोनवणे
संयोजक – शेतकरी कर्जमुक्ती अभियान, नाशिक जिल्हा
📱 8806272733 / 9689333399
📧 Farmers.Maharashtra@gmail.com

(संदर्भ: यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री व बँक प्रशासक यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती संलग्न आहेत.)

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!