नाशिक ग्रामीण

संविधानाचा जागर प्रा . आंबेडकरां ची उपस्थिती।

Nandgaon News

वेगवान मराठी :  मारुती जगधने 

। । दि . १५ ऑक्टोंबर २0२५ ॥

नांदगाव येथे संविधान सन्मान मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. प्रा. अक्षयराज आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतीय संविधान हे देशाचे चार स्तंभावर उभे असून, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सर्व नागरिकांना समान हक्क मिळाले आहेत. संविधान टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे आयोजन जागर लोकशाहीचा गौरव – संविधानाचा धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने करण्यात आले होते. हा कार्यक्रम नांदगाव येथील जुन्या तहसिल कार्यालयाच्या परिसरात झाला.

या प्रसंगी व्यासपीठावर नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील, नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, एमव्हीपी संस्थेचे संचालक अमित पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती . दर्शन आहेर, भाजपा व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज चोपडे यांनी केले, सुत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. आयोजन शिक्षणशक्तीचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे यांनी केले होते. या प्रसंगी

भारत वानखेडे, संदेश जाधव ,सुरजमल संत ,देविदास मोरे ,फिरोज शेख ,

 अरण साळवे, भास्कार निकम विलाज कोतकर वाल्मीक जगताप, कपील तेलुरे ,राजा भाऊ पवार महाविर जाधव  , गुढेकर आणि  महीलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोहित जाधव, दीपक अंभोरे, मोहित भोसले, मोहसिन बेग, भुषण मराठे, पंकज जगताप, सागर अडकमोल यांनी परिश्रम घेतले.

या वेळी विशिष्ट समाजोपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.

मुख्य मुद्दे:

  • संविधान सन्मान मेळावा नांदगाव येथे संपन्न.
  • प्रमुख उपस्थिती: डॉ. प्रा. अक्षयराज आंबेडकर.
  • संविधान टिकवणे ही सर्वांची जबाबदारी – अक्षयराज आंबेडकर.
  • विविध मान्यवरांची उपस्थिती व सन्मान.
  • कार्यक्रमाचे आयोजन शिक्षणशक्ती तर्फे करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!