सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ; जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर… !
मुदतवाढ मिळाल्याने निवडणूक आयोगानला मोठा दिलासा...
Wgwan news / breaking / भाऊसाहेब हांडोरे
नाशिक/ सिन्नर : दि. 12 जानेवारी — मोठी बातमी..!
जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय! निवडणुका आता लांबणीवर पडणार की वेळेत होणार? सविस्तर बातमी अशी की
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे.””आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेवरून निर्माण झालेला पेच आणि तांत्रिक कारणांमुळे निवडणूक आयोगाने कोर्टाकडे वेळ मागितला होता. आधी ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत होती, ती आता वाढवून १५ फेब्रुवारी २०२६ करण्यात आली आहे.””याचाच अर्थ, आता १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय गोटात मोठी खळबळबळ उडाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्याने 31 जानेवारी पूर्वी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता लांबणीवर पडल्या आहे. या संदर्भात कोर्टाने नुकताच निर्णय दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या बाबतीत आज निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे या निवडणुका पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला पंधरा दिवसांची मुदत वाढ दिली असून आता 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे निवडणुकीच्या गोष्टीची प्रतिक्षा आता संपुष्टात आली असून राजकीय वर्तुळात कार्यकर्त्यांना आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी महाराष्ट्रातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणुका पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला पंधरा दिवसांची मुदत वाढ दिली असून आता पण 10 फेब्रुवारी 2026 निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे यामुळे निवडणुकीच्या गोष्टीची प्रतीक्षा करणाऱ्या राजकारणा आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार …



