गोदावरी कालवा सिमेंट काँक्रीटीकरणाचा घाट : या गावांची अवस्था “धरण उशाला कोरड घशाला “
नाशिक व नगर जिल्ह्यांतील शेतकरयांनी केला विरोध....

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
गोदावरी कालवा सिमेंट काँक्रीटीकरणाचा घाट : या गावांची अवस्था “धरण उशाला कोरड घशाला ”
सिन्नर , दि : 9 में 2025 नाशिक सह नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या गोदावरी उजव्या तट कालवा आता महाराष्ट्र शासनाकडून सिमेंट काँक्रीटीकरणाचा घाट घातला जात आहे त्यामुळे शेती क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या कालव्यावर सिमेंट काँक्रीटीकरणाचा अस्तीरीकरण शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन शेती क्षेत्रात नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ चांदगुडे यांनी गावोगावी जाऊन जनजागृती केली जाते आहे व गावपातळीवर शेतकरी व ग्रामस्थ यांच्या बैठका घेऊन ठराव करून शासनाकडे पाठविण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या गोदावरी उजव्या तट कालव्याचा उगम असलेला या कालवा क्षेत्रात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पुर्व भागातील अनेक गावांचा समावेश आहे. या कालवा क्षेत्रात हजारो एकर शेती या पाण्यावर अवलंबून आहे. या कालव्यातून पाणी फिरले तर नाशिक व नगर जिल्ह्यांतील क्षेत्रातील जमीन ओलिताखाली आहे.. परंतु शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे त्यामुळे या कामात प्रचंड विरोध केला जाणार असल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे या कामात विचार करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हे काम थांबवावं असे मत या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरयांनी केली आहे.
या होऊ घातलेल्या कामाला विरोध दर्शविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील सांगवी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. दिनांक 5/5/2025 रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.शेतकऱ्यांच्या अतिशय जीवन- मरणाचा असणारा प्रश्न म्हणजेच महाराष्ट्र शासनाने घेतलेला गोदावरी तट कालवा (अस्तरीकरण) कॉंक्रिटीकरण.. यामुळे होणाऱ्या पाण्याचा पाझर कमी होऊन जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. ,तरी प्रत्येक शेतकऱ्याने या कामासाठी स्वतः व घरातील सर्व व्यक्तींना घेऊन सदर ग्रामसभेत उपस्थित राहावे ही नम्रपणे विनंती. ही विशेष ग्रामसभा अति तातडीने खास गोदावरी उजवा तट कालवा ह्या विषयावर भरवण्यात आली होती.
या कडव्या उजव्या तट कालव्याचा होऊ घातलेल्या कामाला विरोध दर्शविण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरयांनी प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन या संदर्भात ठराव करून तो शासनापर्यंत पोहचवा व आपला विरोध दाखवा.. कारण ” आज नाही तर कधीच नाही ” त्यामुळे ओलिताखाली असलेली शेती वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विरोध दाखवा असे मत व्यक्त केले जात आहे.
