अखेर पल्लवी पगारे यांना बार्टीने रुजू केले…
अखेर पल्लवी पगारे यांना बार्टीने रुजू केले...

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला : दिनांक ७ मे /अखेर पल्लवी पगारे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र पुणे (बार्टी) संस्थेने संभाजीनगर येथील कार्यालयात केले रुजू शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या पाठपुराव्याला यश
तालुक्यातील पल्लवी पगारे या बार्टीच्या माध्यमातून मुक्ती भूमी येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या
परंतु त्यांना अचानक पणे कार्यमुक्त केल्यामुळे त्यांना अचानकच मोठा धक्का बसला होता त्यांना अचानक पणे कार्यमुक्त केल्यामुळे त्यांना दीड वर्ष संघर्ष करावा लागला
तेव्हा कुठेतरी त्यांना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी संबंधित विभागाशी बोलून तात्काळ कामावर रुजू करून घेण्यास सांगितले याबाबत येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आत्ताचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा केला होता
त्याचबरोबर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांनी तालुक्यामध्ये मोठे आंदोलन छेडले होते या आंदोलनाला सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता तरी देखील झोपलेल्या प्रशासनाने या प्रकरणाकडे सपशेल पणे दुर्लक्ष करून पगारे यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता येथील काही राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांना हा त्रास सहन करावा लागल्याची देखील चर्चा तालुक्यामध्ये होती
यामुळे वैतागलेल्या पल्लवी पगारे यांनी येथील तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या माध्यमातून संभाजीनगर येथील उपजिल्हाप्रमुख संतोष बोर्डे यांच्या माध्यमातून मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेऊन झालेला सर्व प्रकार सांगितला होता याची तात्काळ दखल घेऊन मंत्री शिरसाठ यांनी संबंधित विभागाला आदेश केले आणि तात्काळ पल्लवी पगारे यांना रुजू करून घेण्यास सांगितले पगारे या रुजू झाल्याच्या नंतर मंत्री संजय शिरसाठ यांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे स्वारीपाचे विनोद त्रिभवन, सिद्धार्थ हिरे यांच्यासह आदींनी मंत्री संजय शिरसाठ यांच्या आभार मानले.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये