महाराष्ट्रातील एवढ्या जिल्ह्यात गारपीटसह जोरदार पाऊस

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
नाशिक, ता. 25 में 2025 पावसाळा आता तोंडावर आला आहे. तसे पाहयला गेले तर में महिन्या मध्ये 15 में पासून पुढे जोरदार पाऊस पडतो. हे अनेक वर्ष आपण पाहत आलो आहे. मात्र कधी कधी में महिना पूर्ण कोरडा जातो त्यामध्ये पाऊस पडत नाही. मान्सुन येण्याचे संपूर्ण भारत वाट पाहतो.
मात्र में महिन्यात पडणारे पाऊस हे वादळी व जोरदार अक्रमक पडतांना अनेक वर्षापासून लोक पाहत आले आहे. में महिन्यात पडणारे पाऊस हे मान्सूनची वार्ता घेऊन आले आहे, असा पहिल्या लोकांचा समज होतो.
आता मात्र हवामान विभागाची माहिती सर्वांन पर्य़ंत पोहचू लागली आहे. हवामान विभागाचे अपडेट लोकांना समजू लागले आहे. त्यामुळे पाऊस पाणी याची माहिती लवकर मिळते.
आता त्यामध्ये हवामान विभागाने मोठं अपडेट दिल आहे. हवामान विभागाने पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. यामध्ये जोरदार पाऊस व गारपीटीसह वादळी वारे वाहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
मार्च महिन्या मध्ये शेतकरी संपूर्ण शेतीची नांगरणी करुन मान्सूनच्या पावसासाठी सज्ज होतो. मागील वर्षी चांगला पाऊस प डल्यामुळे रब्बी हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामध्ये या वर्षी उष्णतेने कहच केला आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमान 45 अंशावर गेले आहे. त्यातचं आता अवकाळी ढग दाटून येत आहेत. गुजरातजवळील अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे, ज्यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
काल गुजरात मध्ये जोरदार पाऊस झाला इंड्यूस cyclonic सरर्क्युलेशन डिप्रेशन बनले त्या कमी दाब क्षेत्रा मुळे 5आणि 6मे अधिकं ढगाळ वातावरण निर्माण होईल पुढील 7ते13 मे दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि इतर जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार होईल. त्यामुळे आपल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी, वारा वादळ विजा या पासून सुरक्षित ठिकाणी राहा पाऊस चालू असताना किंवा वातावरण झाले असे वाटले की झाडा खाली थांबू नका
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार वाऱ्यांसह गारपीटीचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा येथेही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आयएमडीनुसार, आज, ५ मे रोजी मुंबईत वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. महिन्याची सुरुवात ढगाळ आकाशाने झाली आहे. सकाळी सुमारे ५ किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे, ७५% आर्द्रता आणि तापमान २९° सेल्सिअसच्या आसपास असेल – ज्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होईल. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे तापमान वाढत जाईल. ५ मे रोजी मुंबईत ढगाळ आकाश आणि दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटी वादळाची शक्यता आहे.
याशिवाय ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती, भंडारा यासह अनेक जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुलढाणा, अकोला आणि वाशिम वगळता राज्यातील बहुतेक इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी राज्याच्या जवळजवळ सर्व भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस पावसाचा हा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ते जाणून घ्या.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf8Es5…… भेट घ्या pic.twitter.com/0rh7glFqef
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 5, 2025
