शेती

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कारभारी कोण … ? या दिवशी होणार आरक्षण जाहीर … !

सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार


वेगवान नाशिक   / भाऊसाहेब हांडोरे

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कारभारी कोण –   या दिवशी होणार आरक्षण जाहीर … !

नाशिक / सिन्नर , दि , 17 एप्रिल  — गावचा कारभारी कोण होईल हे नक्की सांगता येणार नाही त्यासाठी अरक्षाण सोडतीची उत्सुकता होती ती आता संपुष्टात आली आहे.कारण लवकरच आरक्षण सोडतीची  तारीख जाहीर झाली असून नाशिक जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

सिन्नर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडत दि, 21 व 24 जाहीर होणार आहे .त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे समजले जाणाऱ्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी आरक्षण दि, 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधीत मुदत संपणा- या सिन्नर तालुक्यातील जवळपास 114 ग्रामपंचायत साठी सुधारीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित करण्यात आलेल्या सरपंच आरक्षणातून महिलांसाठी ( अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला सह ) राखून ठेवण्याची कार्यवाही करण्यासाठी पुरुषांकरीता दिनांक 21 / 4/ 2024 रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय सिन्नर येथे आयोजित करण्यात आली आहे तर महिला आरक्षण ( सर्व ग्रामपंचायती ) यांच्याकरिता दिनांक 24 / 4 / 2025 रोजी दुपारी बारा वाजता करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी अधिसूचना काढली आहे. या वेळी निफाड चे प्रांताधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी अनुसूचित क्षेत्रातील व बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत सदस्य / नागरिक / स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले सदस्य / पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्यासाठी अहवान करण्यात येत आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

नाशिक जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतीच्या अनुसूचित क्षेत्रातील 577 अशा एकूण 1.387 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यात सिन्नर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींचा समावेश आहे .यामुळे आपल्या गावचा कारभारी कोण होईल हे मात्र नक्की सांगता येणार नाही त्यासाठी अरक्षाण सोडतीची उत्सुकता निर्माण झाली आहे . यात प्रामुख्याने ज्या ग्रामपंचायतीच्या मुदतीत पूर्ण झाल्यानंतर नवीन येणाऱ्या सरपंचांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे परंतु ग्रामपंचायत आरक्षण जाहीर झाल्यावर सध्या सरपंच म्हणून कार्यरत असलेले विद्यमान सरपंच हे आपला पत्ता कट झाला आहे त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी निगडीत कामं होण्याच्या दृष्टीने हलगर्जीपणा . विकास कामे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.गावपातळीवर सामाजिक हितसंबंध जाणिवपूर्वक टाळुन नागरीकांना वेठीस धरले जाते .कारण आपण यापुढे आता सरपंच होणार नाही या भावनेने काही सरपंच नागरीकांना वागणूक दिली जाते व कामं होण्याच्या दृष्टीने अडचणी करतात असा काही सरपंचाच्या वागणूकीवरुन लक्षात आले आहे.. तसा अनुभव येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!