धन्यवाद राजे … ! माझ्या मनात जसा ” छावा ” होता तसाच तुम्ही उतरवलात —
दिग्दर्शक - लक्ष्मण उतेकर यांनी भाऊक पोस्ट !

वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे
नाशिक सिन्नर दि : 17 मार्च — ” छावा ” न भूतो न भविष्य असा विक्रमी प्रसिद्धी ज्या चित्रपटाची नोंद झाली असून चित्रपटाने सुद्धा एक अद्भुत पुर्ण ” इतिहास ” घडावला व अवघ्या मराठी जनांचे मणात कायमचं घर करुन सध्या तुफान घोडदौड सुरू आहे अशा चित्रपटांची निर्मिती झाली त्या निमित्ताने काही ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले ते म्हणाले —-
“. धन्यवाद राजे! माझ्या मनात जसा ‘छावा’ होता, तसाच तुम्ही उतरवलात … ! “. – लक्ष्मण उतेकर भावूक !!
‘. छावा’ चित्रपटाच्या सेटवर एक हृदयस्पर्शी क्षण घडला, जो केवळ चित्रपटाचं शूटिंग नव्हतं, तर इतिहास जिवंत होत असल्याची अनुभूती होती ! दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासाठी हा चित्रपट केवळ एक प्रोजेक्ट नव्हता, तर छत्रपती संभाजी महाराजांची गाथा पडद्यावर साकारण्याचं एक स्वप्न होतं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वरातील कैदेचा सीन –
— शूटिंगदरम्यान, जेव्हा विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत हा महत्त्वाचा सीन पूर्ण केला, तेव्हा सेटवर भारावलेला क्षण पाहायला मिळाला. हा सीन संपताच लक्ष्मण उतेकर भावूक झाले आणि अश्रूंना वाट मोकळी करून म्हणाले –
“धन्यवाद राजे … ! माझ्या मनात जसा “छावा. ” होता , अगदी तसाच तुम्ही पडद्यावर उतरवलात ,,, !!
— त्यांच्या या शब्दांमधून चित्रपटामागची मेहनत, समर्पण आणि इतिहासाशी असलेली भावनिक नाळ स्पष्ट दिसून आली. एका दिग्दर्शकाचं स्वप्न जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात उतरलेलं दिसतं, तेव्हा अशाच भावना उमटतात !
🔹 हा क्षण फक्त चित्रपटासाठी नव्हता, तर मराठ्यांच्या शौर्यगाथेची खरी जाणीव होती !! अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत …
” छावा ” या चित्रपटाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घातली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात या चित्रपटाचे आयोजित करण्यात येत आहे या साठी येणाऱ्या आर्थिक खर्चासाठी स्वयंस्फूर्तीने स्वतः हुन मदतीचे हात पुढे येत आहेत . आता… छत्रपती संभाजी राजेंच्या मावळा पदरमोड करून या चित्रपटाचे आयोजन करू लागले आहेत जन जागृती व आपल्या राजाचा इतिहास सर्वांसमोर मांडला जातो आहे .. हि प्रेरणा घेऊन अनेक जण जागरूती करून छत्रपतींच्या चा कार्य समाजासमोर मांडले जात आहे.. हा चित्रपट पाहिला तर भाऊक होतं आहे हां या चित्रपटात जिवंतपणा वाटेल अशी माहिती जगासमोर आली हे यावरून सिद्ध केले आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात छावा ” प्रदर्शित झाला आणि एकच आवाज जन मणात कायमचं घर करुन हृदय स्पर्शी कथा ही कायमची रक्तात ठाणं मांडुन आहे… सर्व स्तरातून या चित्रपटाचे स्वागत केले आणि सर्वत्र संचार करत आहे तोच जिवनाचा आधार आहे हे लक्षात येते…
