शेती

तुरीचे भाव कधी वाढणार , शेतकरी प्रतिक्षेत …..

लाडका शेतकरी आला अडचणीत त्यामुळे सरकारी यंत्रणेने...


वेगवान नाशिक /    मारूती जगधाने

बागलाण, दि. २० फेब्रुवारी — तुर उत्पादक शेतकरी  भाव वाढीच्या प्रतिक्षेत आहेत परंतु शासनाचा फक्त वेळकाडुपणा दिसून येत असल्याचे लक्षात आले आहे,  त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आला आहे.यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

पोर्टल बंद असल्याने तूर खरेदी बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा भाव मिळत नाही आणि शासनाच्या संदर्भात शेतकरी नाराजीची भूमिका मांडतो आहे तू उत्पादन बऱ्यापैकी आहे परंतु तुरीला भाव नाही मागील दोन वर्ष तुरीला चांगले भाव मिळाले होते परंतु यावर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसल्यागत अवस्था तुरीची झालेली आहे तुरीला पुरेसा भाव नाहीये शेतकरी मेटाकोटी आला आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

महाराष्ट्रातील तूर उत्पादन, बाजारभाव, आणि शासनाच्या भूमिकेबाबत सध्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत.

 

महाराष्ट्रात यंदा तुरीची लागवड सुमारे १२ लाख हेक्टरवर झाली आहे. पावसाचे समाधानकारक प्रमाण आणि कमी किडींचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. तथापि, उत्पादन वाढल्याने बाजारात तुरीची आवक वाढली असून, परिणामी तुरीचे दर घसरले आहेत. पूर्वी १०,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळणारे दर सध्या ७,००० रुपयांच्या आसपास आहेत.

 

तुरीच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने हमीभावाने तूर खरेदी सुरू केली आहे. चालू हंगामात २,९७,४३० टन तूर खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळेल. तसेच, शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने तूर विकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे。

 

तुरीच्या दरांमध्ये भविष्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईने विक्री न करता, बाजारातील स्थितीचा अभ्यास करून निर्णय घेणे उचित ठरेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!