सिन्नर तालुक्यातुन जाणारा रेल्वे मार्गात बदल नको… खा, राजाभाऊ वाजे
औद्योगिक विकासास चालना मिळावी म्हणून मी मार्गासाठी आग्रही,,,

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर, दि, : १४ फेब्रुवारी — नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा सिन्नर, संगमनेर मार्गाने च हवा कारण चाकण, सिन्नर,सातपुर येथील औद्योगिक वसाहतीत उद्योगाला चालना देण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची पुन्हा भेट घेऊन हा प्रस्तावित रेल्वे मार्ग जुन्या मार्गाने च हवा असा आग्रह धरतला आहे आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचे नाशिक चे विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे..
नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा २३४. ६०कि.मी लांबीचा प्रस्तावित सेमी हायस्पीड दुहेरी मार्ग आहे.जो महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिकला चोवीस रेल्वे स्थानकाद्वारे जोडला जाणार आहे आणि त्याची किंमत १६ ,०३९कोटी रूपये आहे.
तसेच या ग्रिनफिल्ड मार्गावरील प्रवासी गाड्या, दोनशे किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील, या रेल्वे मार्गाची अंतिम मुदत २०२७ आहे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातीमधुन जातांना पुणे ते नाशिक हे अंतर दोन तासात पूर्ण करेल , या मार्गांवरील मालगाड्या शंभर किमी प्रति तास वेगाने धावतील. व चाकण , खेड, नारायणगाव,मंचर,आणि सिन्नर,सातपुर औद्योगिक वसाहतीतील क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे हा जुन्या मार्गाने च हवा असा आग्रह धरत खासदार राजाभाऊ वाजे यांनी उचलून धरली आहे.
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प “जैसे-थे” उभारा,नाशिक-पुणे रेल्वेसाठी खासदार राजाभाऊ वाजे यांचा सातत्याने पाठपुरावा, मंत्र्यांना पुन्हा साकडे*
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुन्हा एकदा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. या विषयाच्या संदर्भात आत्तापर्यंत खासदार वाजे यांची मंत्री वैष्णव यांच्यासोबत पाचवी भेट आहे. यापूर्वी हा प्रकल्प पूर्वीच्याच अर्थात नाशिक, संगमनेर, नारायणगाव, चाकण मार्गेच होण्याबाबत रेल्वेमंत्री देखील आग्रही होते. मात्र, पुन्हा शिर्डी, अहिल्यानगर मार्गे प्रकल्प उभरण्याबाबत चाचपणी केली जात असल्याच मंत्री वैष्णव यांनी पुणे दौऱ्यावर असताना म्हंटले होते. दरम्यान, खासदार राजाभाऊ वाजे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत हा रेल्वे मार्ग जुन्या प्रस्तावित मार्गानेच व्हावा यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा फक्त नाशिक आणि पुणे या शहरांसाठी, दरम्यानच्या भागासाठी नव्हे तर पश्चिम भारताला दक्षिण भारताशी जलद गतीने जोडण्यासाठी देखील महत्वपूर्ण असल्याचे म्हणत जुन्याच मार्गाने प्रकल्प होणे का गरजेचे आहे. तसेच नागरिकांची काय मागणी आहे याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कैफियत मांडली. सातत्याने नवनवीन अडचणी निर्माण होऊन हा प्रकल्प रखडला आहे. जुन्या मार्गासाठी महारेलने बऱ्यापैकी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे. तसेच, डीपीआर देखील तयार आहे. राज्य सरकार देखील याबाबत सकारात्मक असूनही हा प्रकल्प रखडला आहे. याबाबत खासदार वाजे यांनी मंत्री वैष्णव यांना साकडे घातले आहे.
