वेगवान नेटवर्क / मारुती जगधने,अविनाश पारखे
नांदगाव तालुक्यातील चांदवड मनमाड रोड वर मनमाड नजीक झालेल्या अपघातत दोन शाळकरी मुलांचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मनमाड येथील मनमाड चांदवड रोडवर पाटील गॅरेज समोर चांदवड कडून मनमाड कडे येत असताना रस्त्यात गाई अंगावर आल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत बॅलन्स गेल्याने मोटरसायकल रोडवर पडली.
यावेळी मागून येणाऱ्या भरदार ट्रकने या दोघांनाही चिरडले यात मोटरसायकल वरील आदित्य मुकेश सोळशे व वैष्णवी प्रवीण केकान राहणार हनुमान नगर मनमाड या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला.
अपघात इतका भयानक होता की दोन्ही मुलांची ओळख पटणे अशक्य नव्हते मात्र घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला
Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…