
वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.24 ऑक्टोबर-
नांदगाव तालुका हा भयमुक्त करण्यासाठी जनतेच्या आग्रहामुळे मी येथे उमेदवारी करत असुन भुजबळ हा ब्रँड आहे आणि या ब्रँडवर मी निवडणूक लढवणार आहे.येथील नेत्यांना तसेच जनतेला पुन्हा एकदा सन्मानाने जगवण्यासाठी आणि भयमुक्त जगण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार आहे.येत्या 28 तारखेला मी नांदगाव येथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यासाठी माझ्यामुळे महायुतीला अडचण येऊ नये म्हणुन मी आज माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
मनमाड,नांदगाव मतदारसंघात विकासाच्या गप्पा केल्या जातात मात्र येथे विकास नाही तर भीतीयुक्त वातावरण विद्यमान आमदारानी केले आहे असे समीर भुजबळ म्हणाले.
येथील इतर पक्षाच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून,त्यांना धमक्या देऊन आपल्या सोबत घेतले आहे. याची काही उदाहरणे आहेत. संतोष गुप्ता यांना गांजाच्या खोट्या केसेसमध्ये अडकवले. माजी आमदार संजय पवार,माजी नगराध्यक्ष योगेश पाटील यांचेही तेच झाले आहे.
सर्वसामान्य जनतेच्या भावना ऐकून घेत जनतेच्या प्रेमापोटी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मनमाड व नांदगाव मतदारसंघातील जनतेने मला साथ द्यावी असे आवाहन देखील समीर भुजबळ यांनी यावेळी केले.

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…