सिन्नर विधानसभा : ठाकरे गटाकडून महिला उमेदवारांची चाचपणी
सौ.तेजेस्वनी वाजे यांच्या नावाची चर्चा

वेगवान नाशिक / भाऊसाहेब र हांडोरे
सिन्नर : दि. ३० ऑगस्ट– राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ निहाय जोरदार तयारी सुरू झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार… यासाठी वेगवेगळ्या मार्गाने सर्व च पक्षाने आपला उमेदवार देण्यासाठी हालचाली वेगात सुरू केली आहे.त्या अनुषंगाने सिन्नर मतदार संघाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने तालुक्यांत महिला उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून नाशिक लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या चुलती सौ. तेजस्विनी हेमंत वाजे यांच्या नावाची चर्चा आहे..
सौ.वाजे यांच्या उमेदवारीला उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला आहे असे पक्षाचे पदाधिकारी यांनी खुलासा केला आहे.. परंतु खा. राजाभाऊ वाजे यांनी मात्र सध्या या बाबतीत मौन बाळगले आहे.
विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विकासासाठी कोटींची कामे मार्गी लावण्यासाठी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून तालुक्यातील जनतेला कणखर नेतृत्व मिळाले असल्याचे दाखवून दिले.. त्यामुळे श्री कोकाटे यांचा विकास कामांचा करण्यात आघाडीवर आहेत. त्यांची लोकप्रियता लक्षात घेता त्यांना रोखण्यासाठी सर्व च पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत.. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाने तालुक्यांत महिला उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे..
सिन्नर विधानसभा निवडणूक संदर्भात सर्व नवोदीत कार्यकर्ते विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना पराभूत करण्यासाठी वेगवेगळे पक्षांमार्फत सरसावले आहेत. प्रत्येक पक्षांनी सर्व्हेही केले. हे सर्व्हे करणांरांसोबत आपलेच नाव कसे योग्य आहे ,हे रेटविण्यासाठी काहींनी सोयीनुसार फिल्डींगही लावली. मात्र कोणत्याही पक्षाने याबाबत अजून ठोस भूमिका घेतलेली नाही.
आघाडीचे बाबत सिन्नर तालुक्यातील सद्या चर्चेत असलेल्या नावापैकी कोणत्या नावाचा विचार करायचा हे बाकी विद्यमान *खासदार राजाभाऊ वाजे यांनाच विचारले जाणार असल्याचे निश्चत आहे…सिन्नर विधानसभेची जागा महीला उमेद्वाराकरीता सोडणेबाबत आघाडीच्या नेत्याचे एकमत झालेले दिसते…व त्यात प्रमुख्याने सौ.तेजस्वीनी हेमंत वाजे* या नावाबाबत मुबंईत चर्चा सुरू झाली असून, वाजे कुटूंबातच उमेद्वारी देण्याचे संकेत खाजगीत वरीष्ठाकडून दिले जात आहेत… *श्री. हेमंतनाना वाजे हे सिन्नर शहर नगराध्यक्ष,सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे संचालक, रोटरी क्लब, तसेच मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालकपदी राहीलेले असून त्यांचा तालूक्यात सर्वदूर परीचय आहे .
सौ.वाजे ह्या कोल्हापूर येथील राजघराण्यातील एक राजकीय वारसा लाभलेल्या सुसंस्कृत व सामाजिक इतिहास असलेल्या अनुभावी नवीन चेहरा देऊन आमदारकी ला सामोरे जाण्यासाठी हे एक वेगळं पाऊल उचलले आहे.. लहानपणापासून राजकीय वातावरण वाढलेल्या सौ वाजे यांचे दोन्ही भाऊ आमदार म्हणून निवडून आले आहे त्यामुळे या वेळी श्री कोकाटे यांचा आमदारकी चा वारु रोखण्यासाठी हा नवीन फंडा वापरला जात आहे.
” कुणीच ओळखत नाही. निवडुनही येणार नाहीत. हेमंत वाजे मराठा विदया प्रसारकमधे पराभूत केले हे विसरले का?वाजे घरातील कुणीही यापुढे आमदार होणार नाही.आणि सिन्नर तालुक्यातील गाव काय सिन्नर शहरही या बघिणीला माहीत नाही. लोकांनाही उमेदवार माहीत नाही.कै.अशोक विठ्ठल वाजे पराभूत केले जनतेन हा अनुभव लक्षात ठेवावा.प्रकाश वाजे पराभूत केले.हेमंत वाजे एम वी पी ला पराभूत केले आणि दुसरया टर्मला राजाभाऊ वाजे पराभूत केले हे लक्षात घ्यावे।.हेमंत गोडसे नको म्हणून राजाभाऊ वाजे यांना खासदार केले सर्वांनी मदत करत हेही लक्षात ठेवावे.आता वाजे आमदार नाही होऊ शकत….. श्री.शरद शिंदे. ( स्वराज्य पक्ष तालुकाध्यक्ष) )
सौ .तेजस्वीनी वाजे यांना सिन्नर शहरासह तालूक्यातील सर्वच गावांना श्री. राजाभाऊ वाजे यांचे आमदारकीचे काळात व नुकतेच खासदारकीचे काळात तसेच मराठा विद्याप्रसारक निवडणूक काळात प्रचार कार्य केल्यामुळे…त्यांना सिन्नर शहरासह तालूक्यातील दर गावी व्यक्तीश: ओळखणारा मतदार मोठ्याप्रमाणात आहे .
वाजे घराण्यातील कोणीही महीला पुढे असल्यास ही निवडणूक अतिशय सहज होणार असल्याचा गोपनीय अहवाल त्रयस्थ सर्व्हे करणारांनी आघाडी प्रमुखांकडे सुपूर्द केल्याचे कळते.
सौ तेजस्वीनी हेमंत वाजे यांचे उमेद्वारी बाबत श्री. हेमंतनाना यांचेशी राज्यातील वरिष्ठांनी संपर्क साधला असला, तरी आघाडीचे नेते जो काही व कोणताही निर्णय घेतील तो तालुक्याला मान्यच असेल. जेष्ठ बंधू प्रकाशभाऊंना याबाबत सर्व अधिकार असल्यामुळे ते जो निर्णय घेतील ते कुटूंबातील आम्हा सर्वांनाच मान्य राहील तुर्तास वेट &वाच हीच भूमिका त्यांनी घेतलेली दिसते .
- मात्र आ . कोकाटे हे फक्त विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार आहे.. तालुक्यातील सर्वांगीण विकास व्हावा यासाठी रात्रंदिवस काम करणारे कोकाटे लोकनेते हे आपलं कर्तव्य म्हणून काम करत राहणार आहे.. विविध योजना राबविण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गासह तालुक्यातील जनतेला एक कणखर नेतृत्व मिळाले आहे .. मला आमदारकी नाही तर विकास चे स्वप्न पडतात आणि ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कोकाटे हे नेहमी सांगत आहेत व त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे कोकाटे यांनी सांगितले आहे ..
