वेगवान नाशिक / मारूती जगधने
नांदगाव, ता. 25 नांदगांव तालुक्यातील पूर्वेकडील सुमारे १५ गावांना लाभ देणारे माणीकपुंज धरण गत तिन दिवसापासून होणार्या संततधारेने धरण काठोकाठ भारले ? असून लवकरच धरणाच्या सांडव्यातुन पाणी बाहेर पडेल.
मागील वर्षी धरणात पाणी वाढ झाली नाही असलेल्या माणीकपुंज धरणातील पाण्यावर नांदगांव तालुक्यातील गावांना टँकरने पाणी पुरवठा केला. हे धरण पहिल्या दोन पावसात भरते पण या वर्षी हे धरण पूर्ण क्षेमतेने भरायला पावसाळ्याचे तिन महिने लागले.
धरण भरल्यावर अधिक असलेले पुर पाणी कालव्याव्दारे सोडून धरणाखालील गावांचे पाझर तलाव भरुन धरणा खालील गावांना त्याचा सिंचनाला व पिण्यासाठी लाभ मिळतो धरणाच्या पाणलोट क्षेञाखाली येणार्या गांवाना मध्ये चिंचविहीर ,जळगांव बु,पिंपरखेड,परधाडी,पिप्री हावेली,हिंगणे देहेरे,न्यायडोंगरी (ता.नांदगांव),राजदेहेरे,पिंपळगांव, घोडेगांव ,सिंधी,( ता ४० गांव)हि गांवे माणीकपुंज धरणाच्या लाभ क्षेञाखाली येतात.
तसेच धरणावर शेकडोच्या संख्येने कृषीपंपाने उचल पाणी दिले जाते.
धरणाची क्षमता ४९५ द ल घ फु एवढी क्षमता आहे .माणीकपुंज धरणा भरत आल्याने तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी समाधान व्यक्त करतात.