महाराष्ट्राच्या सिमेवर चक्रीवादळ…आता काही खरं नाही
महाराष्ट्राच्या सिमीवर चक्रीवादळ...आता काही खरं नाही
वेगवान नाशिक
मुंबई, ता. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. नाशिक, पालघर या जिल्ह्यात पावसाचे तांडव पाहावयस मिळाले आता महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पावसाचें तांडव होणार आहे. महाराष्ट्राच्या सिमेवर चक्रीवादळाची स्थिती असल्यामुळे अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अर्लट देण्यात आला आहे. Cyclone on Maharashtra border, Meteorological department warns
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निमार्ण झाल्यामुळे महाराष्ट्रावर पावसाचे तांडव पाहावयास मिळणार आह. हवामान खात्याने नवीन अंदाज जाहिर केल्यानुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मंगळवारपर्यंत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कमी दाबाचे क्षेत्र, पूर्वी मध्य बांगलादेश आणि जवळपासच्या प्रदेशांवर, आता उत्तर बांगलादेशवर सक्रिय आहे. याशिवाय, पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून कर्नाटक किनारपट्टी आणि मालदीव प्रदेशापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रताही कमी झाली आहे.
या वर्षी मका की सोयाबीन कोण मारणार बाजी, कोण देणार जास्त पैसा Soybean corn price
शिवाय, आग्नेय अरबी समुद्रापासून गुजरातपर्यंत वरच्या हवेत चक्रीवादळाचे परिसंचरण आहे, जे तीव्र झाले आहे. या स्थितीमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी सरींची शक्यता आहे. अरबी समुद्र म्हणजे महाराष्ट्र किनारपट्टी आहे. महाराष्ट्राला समुद्राची बरीच मोठी किनारपट्टी लाभली आहे. ही महाराष्ट्राची सीमा बरीच मोठी असल्यामुळे याचा परिणाम म्हणून महाराष्टातील जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘यलो अलर्ट’अंतर्गत क्षेत्रः
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.