मोठ्या बातम्या

या तारखेला महाराष्ट्र बंद राहणार


वेगवान नाशिक

मुंबई, ता. 21 महाविकास आघाडीकडून येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा करण्यात आली आहे.

 

महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत ही गंभीर घटना घडली ती शाळा भाजप आरएसएसशी संबंधीत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला तर या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देत आहे. तरी जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!