शेती

heavy rain पुढील तीन तास महाराष्ट्रासाठी सावधान, धो-धो पाऊस

heavy rain पुढील तीन तास महाराष्ट्रासाठी सावधान, धो-धो पाऊस


वेगवान मराठी नेटवर्क

heavy rain in Maharashtra: पुणे, ता. अनेक दिवसापासून विश्रांती दिलेल्या पावसाने आता धो-धो पध्दतीने बरसण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी  पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला होता. मात्र आज नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सातारा,नाशिक मराठवाडा सह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस पडणार असून वादळांमुळे नुकसान होणार असून वीजेचा कडकडाट सह ढगांचा गडगडाट होणार आहे.

 

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

महाराष्ट्राच्या इतर भागातही अशीच परिस्थिती दिसून आली. IMD ने पुढील चार तासांत पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात ढगाळ आकाश आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. पावसामुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

कोठे पडणार धो-धो पाऊस घ्या जाणून

 

 

नाशिक जिल्ह्यात पावसाची बॅटींग

( भाऊसाहेब हांडोरे कडून )  सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात दमदार पाऊस सुरू… दोन महिने विश्रांती नंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला… पाऊस कमी झाल्याने बहुतेक शेतकर्यांनी पिकांची आशा सोडली होती. परंतु आठ दिवसांत प्रचंड उष्णतेमुळे ग्रामस्थ उकाड्याने हैराण झाले होते.. परंतु पावसाने दमदार हजेरी लावली आहे.. अजुन जास्त पावसाची अपेक्षा आहे.

 

 

(अविनाश पारखेंकडून )मनमाड- सुमारे 2 तास पावसाची संततधार सुरू आहे.वातावरणातील उकाडा कमी झाला आहे मात्र रिपरिपिमुळे रस्त्यावर चिखल झाला आहे.वाहने चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.नगर-मनमाड राज्य मार्गावर रेल्वे उड्डाण पुलावर खड्डे पडल्याने मोठ्या वाहनांना देखील हळू प्रवास करावा लागत आहे.

 

 

(मुक्ताराम बागुलकडून )  नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील बोलठाण परिसरात आज सायंकाळी सहा वाजेपासून पावसाने हजेरी लावल्याने बोलठाण परिसरातील शेतकरी राजा सुखावला आहे. दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी तिसऱ्या श्रावणी सोमवारी सायंकाळी सहा वाजेपासून वादळ वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. पाऊस पिकांना जीवदान ठरला असल्याने नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोलठाण, जातेगाव, रोहिले बुद्रुक,ढेकु, जवळकी, आदी भागांसह परिसरातील शेतकरी राजा सुखावला आहे.

 

 

(मारुती जगधनेकडून )  दि १९ रोजी नांदगांव शहर व ग्रामीण भागात वादळवारा आणी पाऊस जेमतेम अर्धातास सुरु होता या दरम्यान वादळाच्या तडाख्यात बाजरी व मका पिकाचे मोठे नुकसान झाले वादळामुळे पिके भुईसपाट झाली आहे पुन्हा खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामे करणे व शेतकर्याना अनुदान मिळवून देण्याची जबाबदारी शासन व प्रशासनाला घ्यावी लागेल सायंकळी झालेल्या अर्धातास पावसाने बाजरी मका या पिकांना फटका बसला आहे पिके जमिनीला झोपली आहे .

 

 

दोन आठवड्यांच्या विरामानंतर विदर्भासह महाराष्ट्रात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात पाऊस झाला. नाशिकमध्ये अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने शहरात अक्षरश: पाणी साचले होते. नाशिकला आज दुपारी मुसळधार पावसाने झोडपले, त्यामुळे सांडपाणी गोदावरी तलावात वाहून गेले. रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले आणि शहरातील उड्डाणपूल पोहण्याच्या पुलासारखे दिसू लागले. पुलावरून वाहने जात असताना, धबधब्यासारखे पाणी खाली रस्त्यावर आले, त्यामुळे पूल पाण्याखाली गेला की काय अशी चिंता निर्माण झाली.

 

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी ५ च्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील सैलानी, पिंपळगाव सराई, रायपूर, ढसाळवाडी आदी भागात तासभर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे स्थानिक व्यवसायांचे मोठे नुकसान झाले. शेती पिकांचेही नुकसान झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील खामगाव आणि संग्रामपूर भागातही मुसळधार पाऊस सुरू असून, शहरातील रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले आहे.

 

अकोला जिल्ह्यातील पावसाच्या पाण्यामुळे घरे

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काही भागात ढगफुटीसारखा पाऊस झाला. शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रभर पाऊस सुरूच होता. त्यामुळे अकोट तालुक्यातील रुईखेड गावातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. गावकऱ्यांनी आपापल्या घरांमध्ये पुराचा सामना करताना निद्रानाश रात्र काढली. आज सकाळचा पाऊस थांबला असला तरी गावातील रस्ते अजूनही नदीसारखे पूर आलेले दिसतात. अनेक शेतातही पाणी साचले आहे, ज्याचा पिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानाची चिंता निर्माण झाली आहे.

 

( राहुल देवरेंकडून) नाशिक जिल्ह्यतील देवळा तालुक्यातील उमराणे परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु असून ढगांचा गडगडाट व वीजांचा कडकटाट होत आहे.

 

(अतुल सुर्य़वंशीयांच्याकडू ) मागील काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने आज पिकांना काही प्रमानात दिलासा मिळाला.
बागलाण तालुक्यातील सटाणा शहरात चालला पाऊस झाला तर डांगसौंदाने , निकवेल कंधाने, निरपुर, तिळवण, खमताने परीसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

 

 

येवला एकनाथ भालेराव – येवला तालुक्यातील पिके वाडीच्या अन फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच माना टाकू लागल्या आहे येवल्याच्या उत्तर पूर्व भागासह पिके करपू लागली आहे थोडेफार पाणी असलेले शेतकरी पिकांवर तुषार ठिबक सिंचनाने पाणी देत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!