नाशिक ग्रामीण

योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने नांदगाव तालुक्यातल्या दोन तरुणांचा मृत्यू

योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने नांदगाव तालुक्यातल्या दोन तरुणांचा मृत्यू


वेगवान नाशिक / मारूती जगधने

नांदगांव : नांदगांव तालुक्यात शासकिय रुग्नालायात वेळेत पुरेशा रुग्न सेवा मिळत नसल्याने संर्पदंश झालेले रुग्न दगावत आहे. नांदगांव तालुक्यातील जातेगांव येथील नागरीकाना सर्पदंश झाल्यावर पुरेशी सुविधा मिळत नाही. या कारणास्तव एका महिण्यात दोन तरूनांना जीव गमवावा लागला आहे. दि १८ रोजी संतोश रघुनाथ लाठे वय ३५ रा.जातेगांव ता नांदगांवयास सर्पदंशावर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यु झाला आहे .

 

या बाबात नागरीक चिंता व्यक्त करतात. सुमारे २५ दिवसापूर्वी गवंडीकामगार देविदास बाळू शेळके वाय ३८ यांचे पण सर्पदंश झाल्याने मृत्यु झाला होता सुमारे एका महिण्यात दोन तरुनांना सर्पदंशावर पुरेसे उपचार न मिळाल्याने मृत्यु झाल्याने नागरीक आरोग्य यंञनेवर नाराजी व्यक्त करु लागले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

दि १५ रोजी संतोश लाठे यांना शेतात बांदावर गवत कापतांना अचानक सर्पदंश झाला त्याना बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार दिले नंतर नांदगांव ग्रामीण रुगनालायत दाखल केले तेथून त्यांना मालेगांव हलविण्यात आले दि १८ रोजी मालेगांव येथे त्यांचे निधन झाले.

 

सर्पदंशावर जालीम उपचार न मिळाल्याने जातेगांव च्या दोन तरुनाना प्राण गमवावे लागले संतोश लाठे हे कुटुंबाचे एकुलते एक वारस होते त्याच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुली ,मुलगा असा परीवार आहे त्यांच्यावर जातेगांव येथे राञी उशीरा अंत्यसंस्कार होणार आहे .

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!