आर्थिकनाशिक ग्रामीण

मध्य रेल्वेने घेतला निर्णय,सामान्य श्रेणी डब्बे वाढणार…

आरक्षित डब्यांमधील अनधिकृत प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव दि.23 –

रेल्वेने कडक नियम केल्यानंतरही आरक्षित डब्यांमधील अनधिकृत म्हणता येत नाही पण सामान्य श्रेणीचे तिकीट धारक प्रवाशी व्यक्तींचा प्रवेश कमी झालेला नाही.त्याचा परिणाम म्हणून कित्येक वेळा प्रवाशांची शाब्दिक चकमक नित्याची बाब झाली आहे.कधी अशा घटना मोठ्या घटनांमध्ये रुपांतरीत होतात.दोघांनाही त्याचा त्रास होतोच.जवळपास सर्वच लहान-मोठ्या पल्यांच्या गाड्यांचे सामान्य श्रेणी (second class) डब्यांची संख्या कमी असल्याने आणि प्रवाशी संख्या वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे असे प्रवाशी आपसात चर्चा करताना दिसतात. काही प्रमाणात त्यात सत्यता आहे.परिणामी प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास भाग पडते.

आता मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांमध्ये अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डब्बे वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.त्याचा लाभ सामान्य श्रेणी तिकिटावर प्रवास करणाऱ्या व सामान्य श्रेणी डब्यात जागा मिळणार्‍या प्रवाशांना होणार आहेच.तरीही 2,4 डब्बे वाढवून ही समस्या सुटेल असे चिन्ह नाहीच. कारण कित्येकदा सामान्य श्रेणी तिकीट घेऊन प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना नाईलाजाने आरक्षित डब्यातून प्रवास करावा लागेल आणि मग पुन्हा तिकीट तपासनीस यांच्याकडूनही चौकशीचा फेरा…

आरक्षित डब्यांमधील अनधिकृत प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याने त्या श्रेणीतील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

तर आता कोणत्या गाड्यांमध्ये अतिरिक्त सामान्य श्रेणी डब्बे जोडले जाणार ते पाहूया…

विदर्भ एक्सप्रेस, एलटीटी-बनारस एक्सप्रेस, एलटीटी-पाटलीपूत्र एक्सप्रेस,शालीमार एक्सप्रेस, एलटीटी-हावडा एक्सप्रेस,एलटीटी-पुरी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस,मुंबई-हावडा मेल,हटिया एक्सप्रेस,हावडा–अहमदाबाद एक्सप्रेस,गीतांजली एक्सप्रेस,रांची एक्सप्रेस या गाड्यांना प्रत्येकी दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडले जाणार आहेत तर मुंबई-अमृतसर एक्सप्रेस,एलटीटी–अयोध्या, एलटीटी–बलिया,एलटीटी–जयनगर एक्सप्रेस, एलटीटी–बल्लारशाह एक्सप्रेस, एलटीटी–छपरा एक्सप्रेस,एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस, एलटीटी–सुलतानपूर एक्सप्रेस, एलटीटी– सीतापूर एक्सप्रेस,एलटीटी–प्रतापगड एक्सप्रेस,एलटीटी–आग्रा एक्सप्रेस,एलटीटी–राणी कमलापती एक्सप्रेस,पुणे-दानापूर एक्सप्रेस,मुंबई–अमरावती अंबा एक्सप्रेस, पुणे-काजीपेठ एक्सप्रेस, पुणे-लखनौ एक्सप्रेस, पुणे-जसडीह एक्सप्रेस या गाड्यांना प्रत्येकी एक सामान्य श्रेणीचा डब्बा जोडला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली आहे.

यानिमित्ताने किमान 3 तासाच्या प्रवासाच्या अंतरासाठी तरी आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा अटीशर्ती सह मिळाल्यास जनता खुश होईल शिवाय रेल्वेचे उत्पन्नही वाढेल अशी भाबडी आशा जनता बाळगून आहे.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!