मनमाड करंजवण पाणीपुरवठा योजनेचे 95 टक्के काम पूर्ण
मनमाड करंजवण पाणीपुरवठा योजनेचे 95 टक्के काम पूर्ण
वेगवान नाशक /wegwan nashik
नांदगाव दि.30 जुनं 2024 नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या भगीरथ प्रयत्नातून साकार होत असलेल्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवण पाणीपुरवठा योजनेचे 95 टक्के पूर्ण झाले असून येत्या दीड ते दोन महिन्याच्या आत मनमाडच्या नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर येत्या कित्येक वर्षाचा पाण्यासाठी होत असलेला वनवास संपुष्टात येणार आहे.
येवल्याचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब गाढवे, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, शहर प्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, महेंद्र शिरसाठ, भाजपाचे नितीन पांडे आदीसह नागरिकांनी मनमाड ते थेट करंजवण धरण अशी संयुक्त पाहणी केली. सदरचे जलद गतीने सुरू असलेले काम पाहून समाधान व्यक्त केले.
करंजवण धरणातून मनमाड लासलगाव सह रस्त्यावरील भव्य असे जल शुद्धीकरण केंद्रात एका तासामध्ये एक कोटी लिटर पाणी पोहोच होईल व या ठिकाणी एका तासाला बारा लाख 50 हजार लिटर पाणी शुद्ध केली जाईल. आणि मनमाड येथील नागरिकांना एका दिवसामध्ये वीस तास सलग पाणीपुरवठा सुरू राहणार असून प्रतिव्यक्ती 35 लिटर पाणी मिळणार आहे.
यावेळी उपस्थित नागरिकांनी नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मनमाड करून अभावी जेटील बनलेला पाणी प्रश्न सुटल्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे. याप्रसंगी युवा सेना शहर अधिकारी इमले, पिंटू शिरसाट, भाजपा शहराध्यक्ष संदीप नरवडे, मनसे शहराध्यक्ष सचिन शिरूड, अंकित पगारे, विशाल अहिरे, सुभाष माळवतकर, दादा घुगे, विशाल सुरवसे,
तसेच लोकेश साबळे, मुकुंद झाल्टे, अज्जू शेख, विकास वाघ, अमोल दंडगव्हाळ, बाबा पठाण, लाला नागर, कैलास गोसावी, गजू कासार, गोकुळ परदेशी, मन्नू शेख, संजय दराडे, सनी पगारे, स्वराज वाघ, आदी उपस्थित होते.