नाशिक ग्रामीण

भुसावळ येथून रेल्वेने आले पाणी

प्रशासनाचे नियोजन गुलदस्त्यात


वेगवान नाशिक/Nashik/नाशिक, अविनाश पारखे,मनमाड नांदगाव,दि.29 –

मनमाड शहराचा इतिहास पाहता मनमाडला नेहमीच पाणीटंचाईला सामना करावा लागला आहे. नगरपालिकेच्या वतीने केला जाणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कधीकाळी 60 दिवसात झाला होता. अशाही परिस्थितीत मनमाड आणि मनमाड करांनी संयम राखत पाणीटंचाईचा सामना केला.मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे, राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्ती अभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकला नाही. अलीकडेच मनमाड- करंजवण पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प मंजूर झालेला आहे.तोही अजून कार्यरत नाही.

मनमाड शहर हे मनमाड रेल्वेचे जंक्शन म्हणून ओळखले जाते.मनमाड रेल्वे स्टेशनचे स्वतःचे पाणीपुरवठा नियोजन आहे.त्यांचे स्वतःचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे.मात्र तेथे साठवले जाणारे पाणी काही काळापुरतेच मनमाड स्टेशनला पुरते.मनमाड रेल्वे स्टेशनला दररोज सुमारे 22 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते.मनमाड जंक्शन असल्याने रेल्वे यार्ड मध्ये रेल्वे स्वच्छ करण्यास देखील मोठ्या प्रमाणात वापर होतो.तेथे पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबतचा प्रकल्प मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.तरीही रेल्वे स्टेशन वरील वाढता प्रवासी ताण पाहता मनमाड स्टेशनला पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली.साठवण धरणात पाणी नसल्याने पाणी कुठून उपलब्ध करायचे? असा प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर दरवर्षीच असतो, किंबहुना रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था असते.परिणामी देशभरातून प्रवास करणाऱ्या मनमाड जंक्शन मधून जाणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचण निर्माण होते. किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे ही रास्त अपेक्षा प्रवासी म्हणून व्यक्त होणे न्याय्य आहे. मात्र याबाबत प्रशासन किती गांभीर्याने काम पाहते, नियोजन करते? हा प्रश्न अलाहिदा.

अजूनही पुरेसा पाऊस न झाल्याने धरणामध्ये पाणीसाठा वाढलेला नाही. परिणामी चांगला पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करू शकते.भविष्यात जंक्शनमध्ये वाढणारा प्रवासी ताण पाहता रेल्वे प्रशासनाने अगदी गोपनीय रित्या रेल्वे वॅगन मधून सुमारे दहा लाख लिटर पाणी आणल्याची गुप्त माहिती प्रतिनिधी द्वारे समजले आहे.ही प्रायोगिक चाचणी असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे वेळ पडलीच तर भुसावळ येथून रेल्वेने पाणी आणून व्यवस्था करण्याचा शासन, प्रशासन विचार करत आहे.2015 मध्ये सुमारे 35 लाख 62 हजार रुपये खर्च करून रेल्वे यार्ड व स्टेशन मध्ये पाणी वितरणासाठी पाइप लाईन करण्याचे टेंडर निघाले होते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

2013 मध्ये पाण्याच्या पुनर्वापर प्लांट यार्डमध्ये उभारणार अशी माहिती होती.

काल आणलेल्या पाण्याच्या प्रायोगिक चाचणीद्वारे प्रशासन नेमके काय साध्य करणार आहे?हे अजून गुलदस्त्यात आहे.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!