Life Styleआरोग्यआर्थिकखेळनाशिक ग्रामीणनाशिकचे राजकारणसरकारी माहिती

नगरपालिका मुख्याधिकारी हे निष्क्रिय व अकार्यक्षम असल्याची मानव अधिकार आयोगाकडे तक्रार


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव –

मानव अधिकार रक्षक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मनमाड नगरपालिका मुख्याधिकारी हे निष्क्रिय व अकार्यक्षम असल्याची मानव अधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.

शहरात 25 दिवसांनी पिण्याचे पाणी सोडले जाते. सोडलेले  पिण्याचे पाणी हे दुर्गंधीयुक्त व पिण्यासाठी अयोग्य आहे. त्यामुळे नागरिकांना असह्य व दुर्धर आजार उद्भवू शकतात व तसे संशयित रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात वाढत चालले आहेत.

नगरपालिका नागरिकांकडून घरपट्टी,पाणीपट्टी, स्वच्छता कर,पर्यावरण कर,मनोरंजन कर, अग्निशमन कर या सारखे विविध कर GST सहित वसूल करते.परंतु त्या प्रमाणात नागरिकांना सुविधा देण्यास मनमाड नगरपालिका प्रशासन निष्क्रिय व अकार्यक्षम ठरलेले आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

जर दाम आम्ही चुकवतो तर पाणी पुरवठा ही शुद्ध, पुरेसा,वेळेवर व नियमितपणे करावा अशी रास्त व माफक अपेक्षा एक करदाता म्हणुन करणे काही गैर नाही…

म्हणून मानवाधिकार रक्षक मंचतर्फे राज्य मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे व वेळ पडल्यास मुंबई उच्च न्यायालयात देखील दाद मागु व जबाबदार अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाईची मागणी करू.

भारतीय राज्यघटनेत नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळणे हा मौलिक अधिकार आहे. नगरपालिकेने आपले कर्तव्य बजावून नागरिकांना  पिण्याचे शुद्ध पाणी द्यावे अशी मागणी मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे यांनी केली आहे.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!