Rain Update हवामान विभागाकडून पावसाचा नवीन अंदाज आला

वेगवान नाशिक
ऑगस्टमहिन्यात मान्सूनने ब्रेक घेतला होता. यंदाचा ऑगस्ट हा देशातील 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना ठरला आहे. इतिहासातील चौथा मोठा मान्सूचा ब्रेक म्हणून नोंदवला गेला आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये पाऊस पुनरागमन करणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात पावसाचे पुनरागमन होणार आहे. राज्यात पुढच्या 4-5 दिवसात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार स्थितीमुळं तिथे येत्या 48 तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे, अशी माहिती कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच 3-7 सप्टेंबरमध्ये कोकण आणि गोव्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 5 ते 7 सप्टेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे. राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचा यलो अरल्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
3 Sept:राज्यात पुढच्या 4,5 दिवसात पाउस शक्यता.बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती, येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र.
3-7 Sept,#कोकण #गोव्यात हलका-मध्यम मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह काही मुसळधार पावसाची शक्यता
5-7 Sept दरम्यान #मध्यमहाराष्ट्र, #मराठवाडा, #विर्दभात पाउस
-IMD pic.twitter.com/nRkgvNxCGN— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 3, 2023