महाराष्ट्राच्या विकासासाठी नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणले जाणार- देवेंद्र फडणवीस


वेगवान नाशिक

मुंबई: सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणीसमस्या येऊ नयेत म्हणून राज्यात नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणले जाणार असून त्याचबरोबर रिअल सिंगल विंडोद्वारे  जलद परवानग्या दिल्या जातीलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज

 राज्यात होणाऱ्या नवीन पायाभूत सुविधांमुळे उद्योगस्नेही वातावरण वृद्धिंगत होईल, अशी प्रतिक्रिया सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली असून ‘वॉर रुम’द्वारे गुंतवणुकीसंदर्भात करण्यात येणाऱ्या सुयोग्य नियोजनाबद्दल आणि गतिमानतेबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. तसेच समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र बदलेल, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

तसेच फडणवीस यांनी घेण्यात आलेल्या परिषदेदरम्यान उपस्थित झालेल्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यात येईलअसे सांगितले. मुंबईचा झपाट्याने विकास होत असून आता तिसरी मुंबई निर्माण होत आहे. या तिसऱ्या मुंबईत दळणवळणाच्या पर्यायी सोयी पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गपश्चिम द्रुतगती मार्ग तसेच कोस्टल रोड एकमेकांशी संलग्न केले जातीलअसेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी  सांगितले.

संत सेवालाल महाराजांचे वंशजांचा ठाकरे गटात प्रवेश

त्यानंतर फडणवीस म्हणाले,राज्यात नवनवीन उद्योग यावेत यासाठी उद्योग क्षेत्रांबरोबर चर्चा सुरूअसून सेमीकंडक्टर या उद्योगात गुंतवणूक करून उद्योगांना सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच गृहकर्जाच्या व्याजाचा दर कमी करण्यावर भर दिला जाऊन महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सर्व क्षेत्र खुली केले जातील.

ब्रेकिंग! राज्यपालांविरोधात पाठवण्यात आलेल्या त्या पत्राची राष्ट्रपतींकडून दखल

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *