टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू वनडे मालिकेतून जाणार बाहेर


वेगवान नाशिक

नवी दिल्लीः बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी भारतासाठी वाईट बातमी आली आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणादरम्यान शमीला दुखापत झाली. यामुळे तो एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात जरा जपून रहा

भारताला बांगलादेशविरुद्धही दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे आणि शमी या मालिकेतूनही बाहेर जाऊ शकतो. शमीच्या दुखापतीची खोली अजून कळू शकलेली नाही. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाकडे पाहता शमी टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्यामुळे टिम इंडियासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर, जाणून घ्या

सध्या कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख खेळाडू बांगलादेश दौऱ्यावरून भारतीय संघात परतले आहेत. मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात संघाचा भाग होता. मात्र, तो न्यूझीलंड दौऱ्यावर गेला नाही. बीसीसीआयच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, शमीने टी-20 विश्वचषकानंतर सराव केला आणि यादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली.  त्यामुळेच १ डिसेंबरला शमी भारतीय संघासोबत बांगलादेशला गेला नाही.

मात्र मोहम्मद शमीची दुखापत किती खोलवर आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यानंतर भारताला दोन कसोटी सामने खेळावे लागतील आणि शमी या मालिकेतूनही बाहेर जाऊ शकतो.अशा परिस्थितीत तो वेळेत सावरला नाही तर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडची चिंता वाढू शकते. तसेच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना १४ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – देवेंद्र फडणवीस


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *