नाशिकः कांद्याच्या भावात इतक्या टक्क्यांनी घसरण


वेगवान नाशिक

लासलगाव : सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढलेले असताना कांदा या पिकांचे दर घसरले आहे. त्यात १ नोव्हेंबर रोजी सरासरी २ हजार ५५१ रुपये प्रति क्विंटलने विक्री झालेला कांदा आज सरासरी १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलने विकण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आलेली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना

त्यातली त्यात अवघ्या २० दिवसात कांद्याचे दर सुमारे ५० टक्क्यांनी घसरले असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कारण चांगला दर मिळेल या अपेक्षेने साठविलेले उन्हाळी कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यामुळे शेतक-याच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा मनमाडला निषेध

दरम्यान लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला ८ रुपये किलो पासून ते २ हजार रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. तसेच कांद्याचा भाव एवढा कमी झाला की उत्पादन खर्च निघणेही अवघड असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. आणि तसेच प्रचंड खर्च करुन मेहनतीनंतरही शेतकर्‍यांवर केवळ कमी किंमतीत कांदा विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे  शेतकरी आर्थिक कोंडीत अडकला आहे.
त्यात सध्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांना दहा वर्षांपूर्वी मिळणार भाव आणि महागाईच्या काळात आज दिला जाणारा भाव सारखाच असल्याने तो हवालदिल होत आहे. तर दुसरीकडे उत्पादन खर्च वाढल्याने त्याचे आर्थिक गणितही कोलमडले आहे.

गुजरातमध्ये निवडणूक आणि महाराष्ट्रात 1 दिवस सुट्टी, सरकारने जारी केला आदेश

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *