राज्यात कृषीपंपाचा वापर वाढल्याने 23 हजार मेगावॅट विजेची मागणी


वेगवान नाशिक

नागपूर : राज्यात यंदा या महिन्यापर्यंत सातत्याने पाऊस पडतअसल्यामुळे  कृषीपंपाचा वीज वापर खूपच कमी झाला होता. त्यामुळे विजेची मागणी १८ हजारांहून कमी म्हणजे १७ हजार ६२३ मेगावॅट होती. परंतु, आता पाऊस थांबल्याने व कृषीपंपाचा वापर वाढल्याने ही मागणी २३ हजार मेगावॅट वर पोहचली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस

दरम्यान केंद्राच्या वाट्यातून राज्याला ७ हजार १४३ मेगावॅट वीज मिळत होती तर राज्यात सर्वाधिक ६ हजार ३२ मेगावॅट वीज महानिर्मितीच्या कोळसा, जलविद्युत, गॅस, सौरऊर्जा प्रकल्पातून मिळत होती. त्यात सर्वाधिक ५ हजार २६३ मेगावॅट वीज महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील होती.

तसेच  खासगी वीजनिर्मिती प्रकल्पातून ८ हजार ४०३ मेगावॅटची निर्मिती होत असून त्यात अदानी प्रकल्पातील २ हजार ३८४ मेगावॅट, आयडियल १८९ मेगावॅट, जिंदल ४४५ मेगावॅट, रतन इंडिया १ हजार ७२ मेगावॅटसह इतरही प्रकल्पातील वीजनिर्मितीचा समावेश होता. परंतु यंदा या महिन्यापर्यंत सातत्याने पाऊस पडल्यामुळे  कृषीपंपाचा वीज वापर खूपच कमी झाला होता. मात्र ऑक्टोबरच्या शेवटी पावसाने उसंती घेतल्यामुळे कृषीपंपांचा वीज वापर वाढू लागला आहे.

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार – मंत्री दादाजी भुसे

सध्या अनेक भागात थंडी वाढल्याने नागरिकांकडून हिटरचा वापर वाढतोय तर काही भागात उद्योगांमध्येही विजेची वाढीव मागणी नोंदवली जात आहे. त्यामुळे ही मागणी अचानक १७ दिवसांमध्ये सुमारे ५ हजार मेगावॅटहून जास्त वाढलेली दिसत आहे.

गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हि बँक देतेय सर्वात कमी व्याजदर

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *