राज्यात दिव्यांगांसाठीच्या या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मान्यता


वेगवान नाशिक

मुंबई : राज्यात सध्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारित दिव्यांग कल्याण आयुक्तालय कार्यरत असून त्यामाध्यमातून दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते, सध्या दिव्यांगांच्या कार्यक्रम खर्चासाठी ११३० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पित केली आहे. लवकरच राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार

याबाबत कालच  मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली. याच बैठकीमध्ये राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून देशात पहिल्यांदाच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

Share Market:भारतीय शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी 134 अंकांच्या खाली

तसेच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेआमदार बच्चू कडूमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगलसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेदिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख आदी  मान्यवर उपस्थित होते.
या निर्णयामध्ये दिव्यांगांसाठी  प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार असल्याचे सांगितले. तसेच दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती इतकी वाढ  होणार, आणि दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र परिवहन विभागाने ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *