वेगवान नाशिक
मुंबई : मागील काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात सत्तेत आलेल्या राज्य सरकारवर विरोधकांकडून ५० खोक्यांवरून आरोप करण्यात येत आहे. यावरून जोरदार वाद सुरु असून हा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. तसा खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटाने दिला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कोणाच्या मध्ये पडू नये Todays Horoscope Marathi
तसेच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर शिवतारे पुढे म्हणाले , राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना शिवीगाळ भाषेत उत्तर दिलं. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापलं असल्याने शिंदे गटानं आता कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची घोषणा
दरम्यान एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वादासाठी आम्ही बाहेर पडलो. ही तत्त्वांची लढाई आहे असं शिंदे यांनी सांगितलं. पण महाविकास आघाडीतील नेत्यांनी याला तत्वांची नाही तर खोक्यांची लढाई करुन टाकली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन चार महिने झाले असून देखील ही घोषणा काय आजही टीका करताना दिली जात आहे.
तर गेल्या अधिवेशनात थेट विधिमंडळाच्या पायऱ्यावरही 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दुमदुमल्या होत्या. राज्याच्या इतिहासात कधी झाला नसेल एवढा गदारोळ 50 खोक्यांवरुन विधिमंडळाच्या पायऱ्यावर बघायला मिळाला. त्यामुळे शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे आमदारामध्ये यावरुनच वातावरण पेटलं आहे.
aliens एलियन्सनी संपर्क साधला तर काय होईल