सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले..


वेगवान नाशिक

केंद्र सरकारने आर्थिक दृष्टया मागस वर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू केले होते. या आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी करण्यात आली असून न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं असून १०३ व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आरक्षणाची तरतूद वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून होणार फायदा

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं असून ते म्हणाले, मराठा तसंच अल्पसंख्यांक समाजातील गरिबांसाठीही हे आरक्षण लागू असणार आहे. कारण ज्या घटकांना आरक्षण मिळत नव्हतं, पण आर्थिकदृष्ट्या हतबल होते अशा घटकांनाही १० टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे जोपर्यंत नव्याने मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजातील गरिबांसाठीही हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू असणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी  सांगितलं आहे.

आर्थिक आरक्षणाच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

त्यानंतर ते म्हणाले, सर्व प्रकारच्या गरिबांसाठी या आरक्षणामुळे शिक्षण आणि नोकरीत एक मार्ग मोकळा करुन दिला आहे. त्यामुळे मी  मोदींचे आभार मानतो. तसेच मोदींनी आर्थिक दुर्बल घटकांना जे आरक्षण दिलं त्याला आज सर्वोच्च न्यायालयाने हिरवा झेंडा दाखवल्यामुळे जातीय आधारावर आरक्षण न मिळणाऱ्या गरिबांना शिक्षण आणि रोजगारासाठी नवे मार्ग उघडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

मुकेश अंबानी विकत घेणार हि विदेशी कंपनी

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *