वेगवान नाशिक
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात नवीन सरकार आले तसे राज्यातील सरकार कधी कोसळेल याबाबत वेगवेगळी विधानं ऐकायला मिळत आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याविषयी सूचक विधानं केली. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून यासंदर्भात शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी खोचक टीका केली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार
दरम्यान शहाजीबाबू पाटील यांनी मिडियाशी बोलताना त्यांनी प्रत्यूत्तर दिलं असून अशी भाकितं यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहेत. १९९५ साली जेव्हा मी पहिल्यांदा काँग्रेसकडून आमदार झालो, तेव्हा ५ वर्षं शरद पवार आम्हाला सांगायचे की पुढच्या महिन्यात सरकार पडणार. पण मनोहर जोशींचं सरकार काही केल्या पडलं नाही. तसेच आताही सरकार पडणार असं म्हणत यांच्या पक्षाचे जे लोक शिंदे गट आणि भाजपाकडे निघून चालले आहेत, त्यामुळे त्यांना अडवण्यासाठी अशी भीती दाखवणारी विधानं केली जात असल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्पांवरून अजित पवारांचा शिंदे फडणवीस सरकारला टोला
तसेच अजित पवारांच्या विधानावरही शहाजीबापू पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले अजित पवार किंवा शरद पवार ही मोठी राजकारणी माणसं आहेत. ९५ सालीही अजित पवारांनी सरकार पाडलं नाही. तेव्हा कुठे गेले होते ते? कुठल्या गावाला गेले होते अजित पवार? पाडायचं होतं की सरकार, त्यात त्यावेळेला एवढंसं सरकार होतं. आता तर खणखणीत १७५ आमदारांचं बहुमत असलेलं सरकार आहे. ते आता तुम्ही पाडायला लागले आहात. तुम्ही एवढे बुद्धीवान आहात का? असं शहाजीबापू म्हणाले.
NCPच्या अधिवेशनानंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार, राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांचा दावा