ठाकरेंची मतदानाला दांडी! मिलिंद नार्वेकर स्पष्टच बोलले, “ते नाही आले तरी हरकत नाही,


वेगवान नाशिक

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीमध्ये गुरुवारी शरद पवार-आशीष शेलार पवार गटाने बाजी मारली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या अमोल काळे यांची अध्यक्षपदी निवड झाली.

कार्यकारिणी परिषद सदस्यपदी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे सर्वाधिक गुणांनी निवडून आले आहेत.

राजकीय आखाड्यात परस्परांविरोधात लढणाऱ्या पक्षांमधील नेते मंडळी क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये युतीमध्ये दिसून आल्याने आधीच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. असं असतानाच विजयानंतर मिलिंद नार्वेकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या मतदानासाठी न आल्यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली आहे.

या मुलाखतीमध्ये नार्वेकरांना ठाकरे कुटुंबातील एकाही सदस्याने मतदानासाठी हजेरी लावली नाही यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. ठाकरे कुटुंबाची तीन मतं मिळाली असती तर तुम्ही अधिक गुणांनी जिंकला असता अशा अर्थाने नार्वेकरांना प्रश्न विचारण्यात आला होता.

तुम्ही नंबर वनवर होता. अजून तीन मतांनी नंबर वन वर असता. ते मतदानाला का नाही येऊ शकले? तुम्हाला ठाऊक असेलच,” असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना नार्वेकरांनी, “ते नाही आले तरी हरकत नाही. उमेदवारी दिली म्हणून २२१ पर्यंत पोहोचलेलो आहे हे फार महत्त्वाचं आहे,” असं म्हटलं.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *